Historical Place in Maharashtra : भारतात अनेक प्रकारच्या बोली आणि भाषा बोलल्या जातात. आपल्या देशात इंग्रजी आणि नेपाळी सारख्या अनेक परदेशी भाषा देखील प्रचलित आहेत. पण तुम्ही कधीही असे ऐकले आहे की जेथे लोक अजूनही पोर्तुगीज बोलतात?

होय, महाराष्ट्रात असेच एक गाव आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील किनारपट्टी भागातील रायगड जिल्ह्यातील कोरलाई गाव हे असेच एक ठिकाण आहे जिथे लोक सामान्य संभाषणासाठीही मराठी मिश्रित पोर्तुगीज भाषा वापरतात.

कोरलाईचे पोर्तुगीज कनेक्शन प्रथम 1505 मध्ये चौल येथे आले, जे कोरलाई गावाजवळ आहे. 1520 ते 1740 पर्यंत म्हणजेच जवळपास 200 वर्षे पोर्तुगीजांनी या प्रदेशात आपले साम्राज्य प्रस्थापित केले. पुढे चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांना येथून हुसकावून लावले आणि हा भाग मराठा साम्राज्यात समाविष्ट केला.

त्यावेळी बहुतेक पोर्तुगीज सैनिक समुद्रमार्गे पळून गेले होते. अशी फक्त 4-5 कुटुंबं या गावात येऊन स्थायिक झाली होती. एकाच कुटुंबातील सदस्य आपापसात आधी लॅटिन आणि नंतर पोर्तुगीजमध्ये बोलू लागले. हळूहळू या कुटुंबातील लोक मराठी भाषा शिकले आणि आज ते मराठी मिश्रित पोर्तुगीज भाषा बोलतात.

कोरलाई किल्ला भूतकाळाची माहिती देतो कोरलाई किल्ला कोरलाई गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनीच बांधला होता. जर तुम्हाला भूतकाळातील पानांमध्ये डोकावून पाहण्यात आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असेल तर कोरलाई गाव आणि या किल्ल्याला नक्की भेट द्या. अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या या किल्ल्यावरून समुद्र आणि त्याच्या उगवणाऱ्या लाटा अतिशय सुंदर दिसतात.

कोरलाई किल्ला पोर्तुगीजांनी हजारो सैनिक आणि घोडे ठेवण्यासाठी बांधला होता. कमी लोकप्रिय असल्यामुळे या किल्ल्याला पर्यटक फार कमी संख्येने भेट देतात. त्यामुळे इथे इतर किल्ल्यांसारखी गर्दी दिसणार नाही.

कोरलाई किल्ल्याचे बांधकाम सुमारे 500 वर्षांपूर्वी 1521 मध्ये झाले होते. हा किल्ला एवढा मोठा होता की 7000 घोडे आणि सैनिक एकाच वेळी किल्ल्यावर राहू शकत होते. हा किल्ला पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीचे रक्षण करण्यासाठी बांधला होता.

त्यामुळे आजही किल्ल्याच्या भिंतींवर तोफांचे दर्शन घडते. जगातील सर्वोत्कृष्ट किल्ल्यांमध्ये गणल्या जाणार्‍या कोरलाई किल्ल्याच्या उभारणीचा एक उद्देश रेवदंडा खाडीच्या वाटेचे संरक्षण करणे हा देखील होता. रेवदंडा हा एक मोठा समुद्रकिनारा आहे, ज्यावरून पोर्तुगीज प्रवास करत असत.

कोरलाई गावात कसे पोहोचायचे?

कोरलाई गावाला सर्वात जवळचे विमानतळ मुंबई विमानतळ आहे जे येथून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. जर तुम्हाला रेल्वेने कोरलाईला यायचे असेल, तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पेण आहे, जे येथून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. पेणहून कोरलाई जाण्यासाठी वाहन भाड्याने घ्यावे लागेल. याशिवाय कोरलाई गाव देशातील अनेक मोठ्या शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *