Famous treks in Maharashtra : या पावसाळ्यात तुम्ही देखील तुमच्या ग्रुप सोबत ट्रेंकिंगचा प्लॅन आखला असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक उत्तम ठिकाण घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही जाऊ शकता. या मान्सूनमध्ये तुम्ही महाराष्ट्रातील रतनगड किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ला 400 वर्ष जुना आहे आणि ट्रेकिंगसाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. इथे दूरवर पसरलेल्या डोंगरातून जाताना पर्यटकांचे मन प्रसन्न होते. तुम्ही इथे एक लांबचा ट्रेक प्लॅन करू शकता आणि या किल्ल्याभोवतीच्या निसर्ग सौंदर्यात रमून जाऊ शकता.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेला हा किल्ला डोंगरावर जंगलात वसलेला आहे. रतनगड किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप गर्दी जमते आणि हा किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय मानला जातो. सुमारे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांनी हा किल्ला युद्धात जिंकला होता. या किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत. मुख्य गेटवर गणेश आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. त्याच्या माथ्यावर अनेक विहिरी देखील आहेत.

Ratangad Fort
Ratangad Fort

रतनवाडीतील मुख्य आकर्षण म्हणजे अमृतेश्वर मंदिर, जे कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. अलंग, कुलंग, मदन गड, हरिश्चंद्रगड, पट्टा हे शेजारचे किल्ले या किल्ल्याच्या माथ्यावरून सहज दिसतात. गडावर अनेक दगडी पाण्याचे कुंडे आहेत. या किल्ल्याला वर्षभर पर्यटक भेट देऊ शकतात. या किल्ल्याला रत्नाबाई तांदळ यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांचे किल्ल्याच्या गुहेच्या आत एक छोटेसे मंदिर आहे.

Ratangad Fort
Ratangad Fort

येथे कसे पोहोचायचे?

या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. एक मार्ग साम्रद गावातून तर दुसरा रतनवाडी गावातून सुरू होतो. येथे प्रवर नदीच्या उत्तरेकडील घनदाट जंगलातून जावे लागते. ट्रेकिंग करताना वाटेत इथे नाश्ता आणि चहा मिळेल. हा किल्ला रतनवाडीपासून 6 किमी, भंडारदऱ्यापासून 23 किमी, पुण्यापासून 183 किमी आणि मुंबईपासून 197  किमी अंतरावर आहे. हा प्रसिद्ध किल्ला 4250 फूट उंचीवर आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर हा रतनगडला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *